पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

फोटोत असणारे गांधीजी पहिल्यांदा नोटांवर कसे आले

इमेज
फोटोत असणारे गांधीजी पहिल्यांदा नोटांवर कसे आले आज आपण इतिहासातील पानं पलटुन, जाणून घेऊया कि, महात्मा गांधीजी भारतीय नोटांवर कसे काय आले. कुठून आला भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो? भारतीय रुपयांच्या नोटांवरील मागील काही वर्षांपासून खूप बदल झाला आहे. अगोदरच्या वर्षांमध्ये यात खूप परिवर्तन केले गेले. परंतु अनेक बदल केल्यानंतरही ह्यामध्ये एका गोष्टीचा बदल झालाच नाही तो म्हणजे महात्मा गांधींचा फोटो. हे कुतूहल सामान्य आहे कि, हा फोटो कुठून आला, हा फोटो कोणी काढला आणि भारतीय नोटांवर त्याचा प्रयोग कसा केला गेला. सर्वात पहिले १९६९ च्या नोटांवर आले बापूजी जाणकारांनुसार सर्वात पहिले १९६९ साली नोटांवर गांधीजींचा फोटो छापला गेला. हा त्यांचा जन्मशताब्दी वर्ष होता. तेव्हा ५ आणि १० रुपयाच्या नोटांवर गांधीजींचा फोटो छापला गेला. महात्मा गांधींचा जन्म गुजरात मधील पोरबंदरला २ ऑक्टोबर १८६९ साली झाला. १९६९ साली गांधीजींचा फोटो छापला त्यावेळी त्यांच्या फोटोच्यामागे सेवाग्राम आश्रम छापला गेला होता. व्हाइसरॉय हाऊस मध्ये काढला होता फोटो १९९६ साल पासून पहिल्या वेळी गांधींच्या फोटो...

आपट्याची पाने

इमेज
आपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात? दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोने घ्या चांदी द्या” म्हणत दसरा साजरा करत असतो. पण आपण आपट्याचीच पाने का वाटतो हे आपणास माहीत आहे का? चला तर मग आज जाणुन घेऊया विजयादशमी तथा दस-याला सोनं म्हणुन आपट्याची पाने का वाटतात. आपट्याची पाने तेजतत्व रुपी आहेत, त्याने वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. आपट्याची पाने तम-रजात्मक असल्याने त्याच्यातून प्रक्षेपित होणारे तेज कण वातावरणात शुद्धता निर्माण करतात. या आपट्याच्या पानात ईश्वरी तत्वाचा वलय निर्माण होतो. त्यामुळे ती पाने एकमेकांना दिल्यावर दोन्ही व्यक्तींच्यात आनंदाचे व स्नेहपुर्वक संबंध निर्माण होतात अशी उदात्त भावना हिंदू परंपरेत आढळून येते. त्यामुळे दस-याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आपण दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोन घ्या सोन्यासारख रहावा” असे म्हणतो. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणज...

नवरात्रीतले नऊ रंग

इमेज
बायकांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग फंडा... नवरात्र आलं की, "सरडासुद्धा जितक्या झटपट रंग बदलणार नाही, तितक्या झटपट या बायका येत्या नऊ दिवसांत रंग बदलतील" हा बायकांच्या रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसण्यावर कमेंट करणारा जोक येतोच येतो. पण बायका आपल्या महाधीट. असल्या फालतू जोकला मुळीच भीक न घालता तेवढ्यात उत्साहाने ठेवणीतल्या साड्या नेसून ऑफीसला जायला निघतात. काहीजणी आणि काहीजणसुद्धा, हा रंग म्हणजे अगदी जीवापाड पाळतात. कधी त्या निमित्तानं नव्या खरेद्यासुद्धा होतात. काही लोकांची, "नाहीतरी एवीतेवी कपडे घालायचे असतातच ना, मग घालू आजचा रंग" अशी भावना असते. तात्पर्य काय, मनापासून किंवा गंमत म्हणून महाराष्ट्रात बरीचशी जनता हे रंगांचं फॅड एंजॉय करते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो. आम्हाला पडला हा प्रश्न. आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी ...

शिवनेरी किल्ला, शिवनेरी ट्रेकिंग

इमेज
शिवनेरी फोर्ट, शिवनेरी ट्रेक मूलभूत माहिती: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व आहे. पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. शिवनेरी किल्ला हा  किल्ला एक दिवसाच्या सहलीसाठी आदर्श आहे आणि मध्यम ट्रेकिंगचा अनुभव आवश्यक आहे. किल्ल्याच्या शिखरावर जाण्यासाठी सात दरवाजे आहेत. ट्रेकचे दोन पर्याय आहेत, एक पायऱ्यांनी आणि दुसरा साखळ दांडीच्या वाटेने !  शिवनेरी किल्ल्याचा दरवाजा शिवनेरी येथे खूप शोध लावले गेले आहे आणि जे लोक ऐतिहासिक स्थळांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी हे आदर्श आहे. कसे जावे: शिवनेरी मध्य पुण्यापासून सुमारे १००-११५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून जुन्नर गावी जावे लागते. कल्याण पासून ११३ कि. मी. आपले स्वतःचे वाहन असल्यास आपण जिथे वाहने उभी करता येतील अशा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी चालवू शकता. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार्‍या लोकांना किल्ल्याच्या पायथ्याकडे जाण्यासाठी जुन्नरपासून सुमारे २ कि.मी. चालणे आवश्यक आहे. शिवनेरी येथे काय पाहावे:  गडावर अनेक ठिकाणी पर्यटन स्थळं पाहायला मिळतात. ■  शिवाई मंदिर -...

अरे वेड्या माणसा

अरे वेड्या माणसा.... मीच फक्त चांगला आहे  बाकी सगळे वाईट तुम्हीच सांगा ही भूमिका Wrong आहे का Right ? स्वतःला " हिरो " ठरवतांना दुसऱ्याला " व्हिलन " करू नको विनाकारण गाऱ्हाणे करत  इकडून तिकडे फिरू नको टोमणे मारणे , कुत्सित हासणे असले धंदे का करतो ? " मीच शहाणा बाकी वेडे " नावं ठेवीत का फिरतो ? पुढच्या क्षणी काय घडणार कुठे कुणाला माहीत असतं विकेट कशी , कधी पडणार कुणालाही ठाऊक नसतं अपॉइंटमेंट घेऊन कधी यमराज घरी येतो का ? गयावया केली म्हणून कुणाला सोडून देतो का ? यमा तुझ्या रेड्यावर मी डबलसीट बसणार नाही ठीक आहे बसू नकोस  असं कधीच असणार नाही मनात असो किंवा नसो यमाच्या मागे बसावंच लागतं श्रीराम जयराम म्हणत म्हणत मसनवाट्यात जावंच लागतं  चोवीस तासाच्या आत तुला रॉकेल टाकून फुकुन देतील कवटी फुटो न फुटो घरी लवकर पळून जातील मूर्ख माणसा त्याच्यामुळे प्रत्येक क्षण जगून घे सखी सोबत पावसा मध्ये चिंब चिंब भिजून घे घर घर काम काम चोवीस तास तेच ते इतकं सोनं , तितके पैसे वेड्या माणसा सोडून दे घण्याच्या बैला जागा हो थोडी तरी मजा कर  ...

"इंद्रायणी नदी आणि मी"

इमेज
"इंद्रायणी नदी आणि मी" काल रविंद्र भट याची कादंबरी वाचत होतो,  "इंद्रायणीकाठी" छान आहे, आवडली. सारांश / संदर्भ ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील ही कादंबरी आहे. रविंद्र भट यांच्या रसाळ आणि ओघवत्या भाषेतून झालेले हे लेखन एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या विश्वात विश्वाची चिंता करणारे लहानगे ज्ञानदेव आहेत आणि ज्ञानेश्वरी लिहून जगाला प्रकाश दाखविणारे प्रगल्भ अधिकारी ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वरांची सर्वच रूपे अंतर्मुख करणारी आहेत. ज्ञानेश्वरांवर आजवर अनेकांनी लिहले आहे. मात्र, ज्ञानेश्वरांचे पूर्ण रूप या कादंबरीतून जसे उलगडले आहे, तसे क्वचितच कोणी! ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगांच्या साखळीतून त्यांचे जीवनसंबंधीचे तत्वज्ञान समोर येते. तेव्हा याच ओळी ओठावर येतात, अगा ज्ञानदेवा प्राज्ञ भागवता, आशीर्वाद देई पामरास आता. आज नेमकी रविवार, आणि आळंदीला जायचा बेत बायको चा झाला. आळंदी जवळ राहायला आहे कधी गेलो नाही आणि रोज कामावर जाण्यात वेळ जातो, कधीतरी फिरायला घेऊन जा, असा बायकोचे शब्द कानावर पडले. मग काय जावे तर लागणारच शेवटी बायकोचा ह...

लहान मुलं आणि मोबाईल

इमेज
पुस्तक वाचण्यापेक्षा लहान मुलांना एखादा विडिओ गेम खेळणे, युट्युब पाहणे जास्त आवडते. असे नेमके का होते असेल? याचे प्रमुख कारण म्हणजे पालक, हो... होय पालकच... आत्ताच्या पालकांना मुलांना सांभाळता येताच नाही, पूर्वीच्या काळात म्हणजे आत्ताच २०-२५ वर्ष झाले असतील घरात आई बाबा मुलगा सून असा लहान परिवार एकत्र राहत असत. आणि एक विशेष म्हणजे आजी आजोबा मुलांचा सांभाळ अगदी चांगल्या पद्धतीने करत. आजीला असलेला मुल संगोपनाचा अनुभव ती आपल्या सुनेला द्यायची.  आता एकत्र परिवार फार कमी ठिकाणी दिसतो, अजून १०-१२ वर्षात ते नाहीसे होणार आहेत. कोणाला सासू नको तर कोणाला सासरे नको. म्हणजे "आपल्या मुलाला आजी आजोबा नकोच" असा अर्थ होतो. आजच्या घरात असतात ती फक्त नवरा-बायको-मुल. मग मुलाकडे लक्ष द्यायला कोण ? साहजिकच आहे त्याचे आई आणि बाबा.  मुलं एक-दिड वर्षाचे झाले की त्यांनी घरात मस्त करू नये, पुस्तक फाडु नये, मध्ये मध्ये सारखं लुडबुड करू नये म्हणून त्याला प्री नर्सरी मध्ये पाठवले जाते. तिथे काय करतात, काय शिकवतात ते आपल्याला चांगलेच माहीत आहे. प्री नर्सरी ला पाठवायचे कारण म्हणजे आपण घरात नसतोच ...

हिंदी दिवस स्पीच - Hindi Day Speech

इमेज
आप में से ज्यादातर लोग जानते होंगे कि हिंदी दिवस हर साल 14 सितंबर को मनाया जाता है क्योंकि 1949 में इस दिन, भारतीय संविधान सभा ने हिंदी को अंग्रेजी के साथ हमारे देश की आधिकारिक भाषा के रूप में स्वीकार किया था। हल साल 14 सितंबर को हिंदी दिवस सेलिब्रेट किया जाता है। देशभर में हिंदी दिवस को वार्षिक समारोह के रूप में मनाया जाता है। हिंदी हमारे देश का राष्टीय भाषा है। साथ ही विश्व में बोली जाने वाली प्रमुख भाषाओं में से भी एक है। 14 सितंबर 1949 को भारत की संविधान ने गणराज्य की आधिकारिक भाषा के रूप में हिंदी को अपनाया। इसके अलावा हिंदी दिवस को 26 जनवरी 1950 को देश के संविधान द्वारा आधिकारिक भाषा के रूप में उपयोग करने का विचार स्वीकृत किया गया था। इस खास दिवस के मौके पर स्कूल-कॉलेज में छात्र भाषण देते हैं। साथ ही अपने भाषण के जरिए लोगों तक हिंदी दिवस सेलिब्रेट किए जाने के कारण को पहुंचाते हैं। स्पीच 1: भारत में हर साल 14 सितंबर को हिंदी दिवस सेलिब्रेट किया जाता है। पूरे देशभर के लोगों के लिए यह एक गर्व की बात थी क्योंकि इस दिन भारत की संविधान सभा ने हिंदी को देश की आधिक...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25