पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

कसे वाचाल? Request Money Fraud फोन पे / गूगल पे फसवणूक

इमेज
फोन पे / गूगल पे फसवणूक   ( UPI Fraud:  Request Money ) गूगल पे, फोनपे, पेटीएम, बीएचआयएम ( BHIM UPI)  प्रकारच्या अ‍ॅप्सवर(Apps) दुसर्‍या व्यक्तीकडून पैशाची विनंती करण्याचा एक पर्याय आहे, ज्याचा फायदा फसवणूक करणार्‍यांनी घेतला आहे. असे म्हणा की आपण एखाद्या व्यक्तीस आपण विक्री करू इच्छित असलेल्या उत्पादनासाठी देयकाची अपेक्षा करीत आहात परंतु आपल्याला ती रक्कम देण्याऐवजी ती व्यक्ती त्या रकमेची देय विनंती पाठवते. हे फक्त इंटरनेट, न्यूज पेपर, न्यूज चॅनेल / Whatsapp वर पाहिले / ऎकले असणार. आज प्रत्येक्ष माझ्यासोबत हे झाले आहे. हे लोकं कसे फसवतात / काय बोलतात / किती वेळात समोरच्या  माणसाला वेडे करतात अथवा फसवतात हे थोडक्यात पाहू. आपले दैनंदिन जीवनात इतके Busy असतो कि काही घटना असे होतात कि ते लवकर लक्षात येत नाही. साधे गाडी चालवत असताना देखील जीवाची पर्वा न करता मोबाईल फोन चा वापर होतो, इतके आपण Busy असतो. खेळ फक्त २ सेकंद मध्ये होऊन जातो, जेंव्हा हा खेळ पूर्ण होतो तेंव्हा पचताव्याशिवाय आपल्याजवळ काही उरत नाही.  आपल्यापैकी बर्‍याचजण...

शाळेच्या गमती-जमती भाग १

इमेज
माझी  आवडती शाळा..... (Nirgude, Tal. Junnar, Dist. Pune) १९९४ ते १९९६-९७ छान वाटतं बोलवायला ना कि फक्त शाळा जरी म्हणते तरी आपले मन लगेच आपल्या बालपणात जातं. आपली शाळा आठवते. आपले जवळचे मित्र, जीव लावणारे शिक्षक आणि सर्वात महत्वाचे मार देणारे शिक्षकही आठवतात. "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" खरच ते खुप गोड दिवस असायचे. हे आत्ता समजायला लागलं, पुन्हा ते दिवस येणे नाही. शाळेत असताना मस्ती मौज-मजा खुप असायची. तेवढेच मस्करी-भांडणही असायचं. आपले शिक्षक आपल्याला सतत मारतात हे त्या वेळेस खुप वाईट वाटायचे, पण आत्ता समजले तो मार आपल्यासाठीच खुप महत्वाचा असायचा. शिक्षक विनाकारण कधीच मारत नसायचे. अपूर्ण गृहपाठ, पाढे पाठ नाही, शाळेची दांडी, शाळेत उशीरा येणे वैगरे कारणे असायचे आणि असे एक-एक किस्से असायचे की आत्ता आठवले तरी गालातल्या-गालात हसायला येत. आपल्या शाळेचा वर्ग म्हणजे सर्वात पुढच्या बाकावर बसलेले आपले मित्र म्हणजे सर्वात हुशार गणले जायचे. मध्यम भागात बसलेले ना हुशार ना ढ, आणि मागच्या बाकावर बसलेले काही विचारायला नकोच, त्यांची गणना मस्तीखोर-भांडखोर, "ढ" अशीच असायची....

सर्वात पहिली आरोळी

इमेज
आ म्हणजे आस्था, ई म्हणजे ईश्वर !! आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !! आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!! आई म्हणजे मंदिराचा कळस… आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !! आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!! आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!! आई म्हणजे वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी : आ ................ई..... आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे...

नैसर्गिक आणि कृत्रिम आंबा

इमेज
नैसर्गिक आणि कृत्रिम आंब्यातील फरक कसा ओळखावा... आंबा म्हणजे फळांचा राजा, त्याचा मधुर स्वाद, गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते . लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे आंबा. आपल्या देशातच नाही तर भारताचा आंबा विदेशात देखील लोकप्रिय आहे. आंबा म्हणजे त्यापासून विविध पदार्थ बनविल्या जातात, त्यात आंब्याचा रस, आंबा पोळी, आंबावडी इत्यादी अनेक पदार्थ आंब्यापासून बनविले जातात. परंतु सध्या आंब्याची नक्कल करुन कृत्रिम आंबे बनविले जातात. हे कृत्रिम आंबे दिसायला आंब्यांसारखेच दिसतात, पण कापून पाहिल्यावर चवीला मुळीच गोड नाही आणि या आंब्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतात.  पारंपारिक पध्दतीने गवताची आढी घालून ४-५ दिवस ठेवून पिकवण्याऐवजी कृत्रिम पद्धतीत ते काही तासात पिकवले जातात.  तुम्ही बाजारात गेल्यावर कसे ओळखाल आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम? चला जाणून घेऊया. १. रंग-  नैसर्गिक आंब्यापेक्षा कृत्रिम आंब्यावर हिरवट डाग असतात. हे डाग केशरी किंवा पिवळ्या रंगात मिसळत नाही म्हणून ते अधिक उठावदारपणे दिसून येतात. हे कृत्रिम आंबे नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा अधिक ...

अक्षय्य तृतीया

इमेज
अक्षय्य तृतीया भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस, साडे-तीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील १ दिवस आहे.   हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया   या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया  साडेतीन  मुहूर्तांपैकी १ शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत / उप वास करण्याचे महत्त्व सांगीतले आहे. जैन  धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.  या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी   अन्नपूर्णा (देवी)   जयंती,  नर-नारायण या जोडदेवाची  जयंती,  परशुराम   जयंती,  बसवेश्वर  जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत   ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तीन मुहूर्तांपैकी एक असला तरी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ...

शिवरायांचे आज्ञापत्र

इमेज
छायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग

मकर संक्रांत

इमेज
‼! मकर संक्रांत ‼! मकर संक्रांत पर्वकाळ:- दि :१५ जानेवारी २०२० संक्रांतीचे वाहन - गाढव उपवाहन - मेंढा वस्त्र - पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र - हातात दंड घेतला आहे वयाने तरुण असुन निद्रीस्त म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे. वासा करिता केवडा फुल घेतले आहे. अपुप म्हणजे (अनरसा) भक्षण खात आहे / करत आहे.  हीरा आणि पोवळा रत्न धारण केले आहे. पुर्वेकडून पश्चीमेस जात आहे, वायव्य दिशेस पहात आहे. मुहूर्त - सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत आहे. संक्रांतीने जी वस्तु धारण केली आहे, त्यावस्तुंचा वापर करणार्‍याला व त्याचा व्यपार करणार्‍याला त्रास होतो. !!! पूजेचा विधी !!! मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची (मडके) पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते, यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जाते. या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं ट...

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

एका भुताची गोष्ट

इमेज
ही एक सत्य घटना आहे. (चिखली, पोखरी - भीमाशंकर, पुणे) माझ्या लहानपणी ची. इयत्ता ८वीत होतो मी दिवाळीत शाळेला सुट्टी पडली की मी काकांच्या गावी जायचो. खुप धम्माल असायची. तिकडे फिरायला खूप आवडायचं मला. काका व सर्व परिवार शेती करायचे, काकांचा मुलगा म्हणजे माझा चुलत भाऊ बंडू आम्ही खूप जिवलग मित्रांसारखे होतो. माझे आई बाबा माझे खुप लाड करायचे. आणि काकांच्या घरी देखील मी सर्वांचा आवडता होतो. माझे चुलत भाऊ पैकी काही जण माझ्यापेक्षा वयाने दोन ते तीन वर्षे मोठे असतील त्यामुळे त्यांच्याशी माझी चांगलीच गट्टी जमलेली होती. ते सुद्धा वाट बघत असायचे मी केव्हा येतोय. माझा चुलत भाऊ बंडू आढारी हा माझा एकदम खास असायचा. मी त्याच्याच सोबत असायचो. मग ते शेतात असो, नदीवर आंघोळ असो की संध्याकाळी बाजारात असो आमची जोड़ी ठरलेली. असेच एका संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. काकांनी फटाके खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. आम्ही दोघानी फटाके खरेदी केले, एसटी स्टॉप च्या बाजूला असलेल्या वडापाव च्या गाडिवर वडापाव खाल्ले आणि घराकडे निघालो. बाजार ते घर अस २०-२५ मिनीटाच अंतर एवढंच की बाजारातून निघाल्यावर एक टेकड़ी पार क...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25