एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

अरे वेड्या माणसा

अरे वेड्या माणसा....

मीच फक्त चांगला आहे 
बाकी सगळे वाईट
तुम्हीच सांगा ही भूमिका
Wrong आहे का Right ?

स्वतःला " हिरो " ठरवतांना
दुसऱ्याला " व्हिलन " करू नको
विनाकारण गाऱ्हाणे करत 
इकडून तिकडे फिरू नको

टोमणे मारणे , कुत्सित हासणे
असले धंदे का करतो ?
" मीच शहाणा बाकी वेडे "
नावं ठेवीत का फिरतो ?

पुढच्या क्षणी काय घडणार
कुठे कुणाला माहीत असतं
विकेट कशी , कधी पडणार
कुणालाही ठाऊक नसतं

अपॉइंटमेंट घेऊन कधी
यमराज घरी येतो का ?
गयावया केली म्हणून
कुणाला सोडून देतो का ?

यमा तुझ्या रेड्यावर मी
डबलसीट बसणार नाही
ठीक आहे बसू नकोस 
असं कधीच असणार नाही

मनात असो किंवा नसो
यमाच्या मागे बसावंच लागतं
श्रीराम जयराम म्हणत म्हणत
मसनवाट्यात जावंच लागतं 

चोवीस तासाच्या आत तुला
रॉकेल टाकून फुकुन देतील
कवटी फुटो न फुटो
घरी लवकर पळून जातील

मूर्ख माणसा त्याच्यामुळे
प्रत्येक क्षण जगून घे
सखी सोबत पावसा मध्ये
चिंब चिंब भिजून घे

घर घर काम काम
चोवीस तास तेच ते
इतकं सोनं , तितके पैसे
वेड्या माणसा सोडून दे

घण्याच्या बैला जागा हो
थोडी तरी मजा कर 
हिरव्या हिरव्या झाडा सोबत
कधी तरी दोस्ती कर

दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकरी
जे जमेल ते घे
लसणाच्या ठेच्या सोबत
शेंगदाणे अन कांदा घे

घरात बसून कुढण्या पेक्षा
टेकडी किंवा डोंगर चढ
नयनरम्य निसर्गाच्या 
गळ्या मध्ये जाऊन पड

गंभीर चेहरा केला म्हणून
समस्या कधी सुटतात का ?
कुठलीच मजा न करता
येड्या डोळे मिटतात का ?

चल उठ बॅग भर
फुकट गाऱ्हाणे करू नको
विनाकारण रोज रोज
थोडं थोडं मरू नको...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट