पोस्ट्स

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे

इमेज
काहीच कळेनासे झालंय बरकां.... काल - परवा - सकाळी ज्यांच्या सोबत मोबाईल वर गप्पागोष्टी झाल्या, ती व्यक्ती आज - संध्याकाळी नाहीत, साधा विश्वास सुद्धा बसत नाही.... अगदी सगळं एखादं रात्रीचे स्वप्न आहे की काय असं वाटतं. मी नकळत व्हाट्सअप - फेसबुक उघडतोय, सध्या फार कमी मोबाईलला हात लावतो. व्हाट्सअप डीपी / स्टेटस, फेसबुक पोस्ट बघणे फार आवडायचं. पण आता इच्छा होत नाही. कारण... कारण तसचं आहे, त्या डीपी मधले हसरा चेहरा... किती जिवंत ! न कळत त्या फोटो वरून नजर हटेना, पुन्हा पुन्हा न बघिल्यासारखे तिरकी नजर जातेच. ते उघडून पाहिले की त्यातले मॅसेज - विनोद - विडिओ, कालच टाकले होते, उद्या नक्की भेटू-खुप दिवस झाले भेटलो नाही म्हणून टाकलेला एक मॅसेज.... हे वाचून डोळ्यांत पाणी येतं... अशीच एक माझ्या स्वप्नीलची कहाणी... स्वप्नीलला कोरोनाची लागण झाली, जेव्हा कोविड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेंव्हा पहिला मलाच कॉल केला. म्हणाला मित्रा, येतोय का...? मी म्हणालो कुठे रे, काय संचारबंदी मध्ये पिकनिक ला जायचा प्लॅन आहे की काय मित्रा...? तो म्हणाला हो १४ दिवसाचा प्लॅन आहे, मी समजतो नक्कीच स्वप्नीलला कोरोना लागण झा...

राघोजी भांगरे (सह्याद्रीचा वाघ) RAGHOJI BHANGRE

इमेज
सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे - अभिवादन दिवस २ मे  आद्यक्रांतिकारक / सुभेदार /  सह्याद्रीचा वाघ महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक पूर्ण नाव :- राघोजीराव रामजीराव भांगरे वडील व आईचे नाव :- रामजी व रमाबाई  गाव :- देवगाव ( तालुका  अकोला, अहमदनगर, महाराष्ट्र) जन्म :- ८ नोव्हेंबर १८०५ ( डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात) मृत्यू :- २ मे १८४८ (ठाणे सेंट्रल जेल - फाशी) आज ठाण्याजवळ शहापूरनजीक [ आज ठाण्यानजीक शहापूर तालुक्यातील एका गावाजवळ त्यांची भग्न अवस्थेत समाधी आहे ] राघोजींच्या जन्मावेळी गायला गेलेला पोडावा   “ रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान मावळ मुलुखाचा राजा होईल महान ! रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!” महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोला) [ शोण   नदीच्या   किना - यावर   वसलेल्या   महाकाळ   डोंगर   रांगेतील   चोमदेव   डोंगराच्या   पश्चिमेकडील   या ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Corporate Management System