एका जिवलग आत्म्याची गोष्ट

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष
(National Girl Child Day)
समजातील मुलगा - मुलगी हा भेद कमी करणं, प्रत्येक मुलीला समाजात तिचा सन्मान आणि हक्क मिळवा यासाठी प्रयत्न करणं, प्रत्येक मुलीला तिचे मानवी हक्क मिळणं, मुलींना त्यांचं आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि पोषक वातावरण आणि आहार मिळवण्यासाठी आवश्यक घटकांचा गांभीर्याने विचार करणं, आत्मरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जागृत करणं या उद्देशांसाठी देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
भारतामध्ये National Girl Child Day म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी २४ जानेवारी दिवशी साजरा केला जातो. केंद्र सरकारने २००८ पासून देशभरात मुलींचं अस्तित्त्व जपण्यासाठी आणि मुलीच्या जन्माबाबत समाजात सुरक्षित, आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी खास उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे.
आज 21 व्या शतकामध्येही भारतात मुलीचा जन्म होणं ही गोष्ट अनेकांना नकोशी वाटते. देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म टाळण्यासाठी गर्भपात करण्यापासून ते अगदी नवजात चिमुकल्यांना बेवारस सोडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
![]() |
मुली वाचवा |
या दिवशी "Save Girl Child" नावावर ठिकठिकाणी मोहिमा चालवल्या जातात. मुलींवरील अत्याचारांबद्दल लोकांना जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्याविरूद्ध संघर्ष करण्याचे आवाहन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था (NGO) या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित करतात.
मुलींच्या सबलीकरणासाठी भारत सरकारने खालील पाच योजनेचा समावेश केला आहे.
१. "बेटी बचाओ, बेटी पढाओ"
मुलींच्या निभावासाठी, संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी २२ जानेवारी २०१५ ला "बेटी बचाओ, बेटी पढाओ" अभियानाला सुरुवात झाली. महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पक्षपाती लिंगनिवडीची प्रक्रिया टाळणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
२. "बालिका समृद्धी योजना"
दारिद्र्य रेषेखाली राहणार्या बालिका आणि तिच्या आईसाठी "बालिका समृद्धी योजना" ही एक स्कॉलरशीप आहे. शिक्षणाचा आणि दैनंदिन खर्च भागवण्यासोबतच मुलींना बालविवाहापासून दूर ठेवण्यासाठी या योजनेमुळे मदत होते. यामध्ये इयत्ता १० वी पर्यंत मुलींना किमान ३००रुपये ते १०००रूपयांची स्कॉलरशीप दिली जाते. ग्रामीण आणि शहरी भागात ही योजना उपलब्ध असून कुटुंबातील एका मुलीसाठी याचा फायदा घेतला जाऊ शकतो.
३. "सुकन्या समृद्धी योजना"
मुलींचे शिक्षण ते लग्न याचं आर्थिक व्यवस्थापन करणारी एक योजना म्हणजे "सुकन्या समृद्धी योजना" आहे. यामध्ये तुम्ही दरमहा २५०रुपये ते दीड लाखापर्यंतची रक्कम तुमच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावाने असलेल्या सुकन्या समृद्धी खात्यात जमा करू शकता. मॅच्युरिटी काळानंतर ही रक्कम चांगल्या व्याजासह तिच्या शिक्षण अथवा लग्नासाठी वापरू शकता. खाते उघडलेल्या दिवसापासून २१ वर्षे पूर्ण झाली की त्याचा आर्थिक फायदा घेता येतो.
४. "उडाण"
सीबीएसई बोर्डाने मानव संसाधन विकास मंत्रालयासोबत "उडाण" ही योजना सुरू केली आहे. यामध्ये मुलींचे इंजिनियर, डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना आर्थिक मदत दिली जाते. एका ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून काही निवडक विद्यार्थिनींची निवड केली जाते. मुलींना विज्ञान आणि विषयासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जातं. मात्र ही सोय केवळ सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या विद्यार्थींनींसाठी आहे.
५. "माझी कन्या भाग्यश्री"
माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आहे. यामध्ये मुलींना किमान ५००० ते १लाख रूपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं.
आज २१व्या शतकात मुलीदेखील मुलांच्या तोडीस तोड स्पर्धेच्या युगात उतरल्या आहेत. त्यांना सबळ करण्यासाठी तुम्ही काय करणार? हे आम्हांला नक्की सांगा. माझ्या मराठी ब्लॉग परिवाराकडून जगातील सार्या चिमुकलींना Happy International Day Of The Girl Child!
टिप्पण्या