पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

मनातलं भूत

इमेज
 ''मनात - विचारात अडकलेलं भूत'' भुतांसारख्या नकारात्मक शक्ती या पृथ्वीवर आपल्यामध्ये आहेत. त्यांचा परिणाम बहुतेक अशा ठिकाणी होतो जेथे लोकांची कमी वर्दळ असते किंवा जेथे स्वच्छता नसते. हि नकारात्मक शक्ती एखाद्या आजारी, पिढीत, नैराश्य किंवा एखाद्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होता-होता मधेच पूर्ण नाहीशी होते. नकारात्मक शक्ती माणसाला कमजोर बनवते. याच प्रत्येक्ष उदाहरण आज मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. ते असे की..... नुकतीच दिवाळी संपत आली होती. दिवाळीचे दहा दिवस जरा जास्तच कामात मग्न होतो. जसे दिवस संपत आले तसा थोडा थोडा वेळ मिळत गेला. खरे तर बायकोला सासरी जायची ओढ लागली होती. तिला ही १५ दिवस सुट्टी होती. मी १० दिवस जरा जास्त काम करून ११व्या दिवशी सासरी जायची संधी मिळाली. संधी यासाठी की माझं जास्त सासरी जाणं होत नाही. बायको चा हट्ट आणि त्यात दिवाळीची सुट्टी. आम्ही दोघे सासरी आल्यावर रात्रीचे जेवण उरकून थोडं बाहेर ५ पावली करायला निघालो. बायको म्हणाली, मी लहानपणी तेव्हा एका ताई कडे जायची, खुप जीव लावायचे ते मला. मी म्हणालो, त्यांना कॉल करून सांग, आपण जाऊ घरी उद्या. पण त्या ताई कडे म...

चंद्रग्रहण

इमेज
  शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर | दुपारी १२.३८ - सायं ४.१७ तुम्हाला माहीत आहे? या पूर्वी ५८० वर्षांपूर्वी १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते, असं तज्ञ सांगतात. खगोलशास्त्रज्ञानाच्या मते, हे शतकातील दीर्घकाळ चालणाऱ्या चांद्रग्रहनांपैकी एक आहे. या ग्रहणाचा कालावधी ३ तास २६ मिनिटे २३ सेकंद असेल, म्हणजेच २००१ ते २१०० मधील इतर कोणत्याही ग्रहणापेक्षा दीर्घकाळ चालणारं ग्रहण असेल. या दरम्यान ९७% चंद्र लाल रंगात दिसेल. नासाच्या म्हणण्यानुसार, हे वर्षातील शेवटचा खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. फ्रॉस्ट मून ही आणखी एक खगोलीय घटना आहे. फ्रॉस्ट मून (Frost Moon) म्हणजे, शरद ऋतूतील शेवटची पौर्णिमा आहे. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक प्रदेशातून दिसणार आहे. हवामानाने साथ दिली तर आपल्या भारतातून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांमधून  चंद्रग्रहण पाहता येईल. चंद्रग्रहण आणि त्याचे धार्मिक महत्व हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी होत असल्याने याचे धार्मिक महत्व मोठे असल्याचे ज्योतिषी सांगतात. हे आंशिक आणि उपछाया चंद्रग्रहण असल्याने त्याचा प्रभाव...

आणि जगायचं राहून जातं

आणि जगायचं राहून जातं जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते. शिक्षण काय असतं?  रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मु...

नवऱ्याचा वेटर मित्र

इमेज
नवऱ्याचा वेटर मित्र बायको : अहो, चला ना दिड वर्ष झालं या लॉकडाऊन मुळे कुठे बाहेर जात आले नाही. ना कुठे मॉल, ना शॉपिंग, ना हॉटेल... पार वैताग आला घरीच बसून. काय चालू काय बंद करता करता पुन्हा सर्वच बंद झालं तर घर जेल सारखे वाटतं. अगं मग चिडतेस कशाला, जाऊ की संध्याकाळी. हो पण कुठे.... हो.....? एक काम करू, तुला संध्याकाळचा किचनला आराम म्हणून जवळच्या हॉटेल मध्ये जाऊ. वाह....! वाह....! अगदी माझ्या मनातले बोललात. छान... मग चालेल, खुप छान वाटेल. असे बोलून मी आपल्या ऑफीसच्या कामात घरच्या-घरी मग्न झालो. सकाळचा चहा - बिस्कीट झाल्यावर दुपारी पण तेच होतं. कारण संध्याकाळी आपण बाहेर जाणार मग घरी जेवण कशाला बनवायचं, हे बायकोच्या डोक्यात. संध्याकाळ झाली तेच बायकोची आवरा-आवर चालू झाली. एरव्ही ती दुपारी झोपत असते, पण आज ना झोप - ना घरचं जेवण बनवायचा त्रास, जाम खुश. मला म्हणाली अहो, आवरा लवकर उशीर होईल मग रात्री येता-येता. याचा अर्थ मी समजून गेलो की बायकोला हॉटेल मध्ये जायची घाई झाली आहे. मनातल्या मनात हसलो आणि मीही तयारी केली. घरच्या जवळच एक हॉटेल होते. तिथे गेल्यावर गेट समोरच लोकांची मोठी रांग होती. आत ...

तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे

इमेज
काहीच कळेनासे झालंय बरकां.... काल - परवा - सकाळी ज्यांच्या सोबत मोबाईल वर गप्पागोष्टी झाल्या, ती व्यक्ती आज - संध्याकाळी नाहीत, साधा विश्वास सुद्धा बसत नाही.... अगदी सगळं एखादं रात्रीचे स्वप्न आहे की काय असं वाटतं. मी नकळत व्हाट्सअप - फेसबुक उघडतोय, सध्या फार कमी मोबाईलला हात लावतो. व्हाट्सअप डीपी / स्टेटस, फेसबुक पोस्ट बघणे फार आवडायचं. पण आता इच्छा होत नाही. कारण... कारण तसचं आहे, त्या डीपी मधले हसरा चेहरा... किती जिवंत ! न कळत त्या फोटो वरून नजर हटेना, पुन्हा पुन्हा न बघिल्यासारखे तिरकी नजर जातेच. ते उघडून पाहिले की त्यातले मॅसेज - विनोद - विडिओ, कालच टाकले होते, उद्या नक्की भेटू-खुप दिवस झाले भेटलो नाही म्हणून टाकलेला एक मॅसेज.... हे वाचून डोळ्यांत पाणी येतं... अशीच एक माझ्या स्वप्नीलची कहाणी... स्वप्नीलला कोरोनाची लागण झाली, जेव्हा कोविड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेंव्हा पहिला मलाच कॉल केला. म्हणाला मित्रा, येतोय का...? मी म्हणालो कुठे रे, काय संचारबंदी मध्ये पिकनिक ला जायचा प्लॅन आहे की काय मित्रा...? तो म्हणाला हो १४ दिवसाचा प्लॅन आहे, मी समजतो नक्कीच स्वप्नीलला कोरोना लागण झा...

राघोजी भांगरे (सह्याद्रीचा वाघ) RAGHOJI BHANGRE

इमेज
सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे - अभिवादन दिवस २ मे  आद्यक्रांतिकारक / सुभेदार /  सह्याद्रीचा वाघ महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक पूर्ण नाव :- राघोजीराव रामजीराव भांगरे वडील व आईचे नाव :- रामजी व रमाबाई  गाव :- देवगाव ( तालुका  अकोला, अहमदनगर, महाराष्ट्र) जन्म :- ८ नोव्हेंबर १८०५ ( डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात) मृत्यू :- २ मे १८४८ (ठाणे सेंट्रल जेल - फाशी) आज ठाण्याजवळ शहापूरनजीक [ आज ठाण्यानजीक शहापूर तालुक्यातील एका गावाजवळ त्यांची भग्न अवस्थेत समाधी आहे ] राघोजींच्या जन्मावेळी गायला गेलेला पोडावा   “ रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान मावळ मुलुखाचा राजा होईल महान ! रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!” महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोला) [ शोण   नदीच्या   किना - यावर   वसलेल्या   महाकाळ   डोंगर   रांगेतील   चोमदेव   डोंगराच्या   पश्चिमेकडील   या ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25