एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

मनातलं भूत

 ''मनात - विचारात अडकलेलं भूत''

भुतांसारख्या नकारात्मक शक्ती या पृथ्वीवर आपल्यामध्ये आहेत. त्यांचा परिणाम बहुतेक अशा ठिकाणी होतो जेथे लोकांची कमी वर्दळ असते किंवा जेथे स्वच्छता नसते.

हि नकारात्मक शक्ती एखाद्या आजारी, पिढीत, नैराश्य किंवा एखाद्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होता-होता मधेच पूर्ण नाहीशी होते. नकारात्मक शक्ती माणसाला कमजोर बनवते.

याच प्रत्येक्ष उदाहरण आज मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. ते असे की.....


नुकतीच दिवाळी संपत आली होती. दिवाळीचे दहा दिवस जरा जास्तच कामात मग्न होतो. जसे दिवस संपत आले तसा थोडा थोडा वेळ मिळत गेला. खरे तर बायकोला सासरी जायची ओढ लागली होती. तिला ही १५ दिवस सुट्टी होती. मी १० दिवस जरा जास्त काम करून ११व्या दिवशी सासरी जायची संधी मिळाली. संधी यासाठी की माझं जास्त सासरी जाणं होत नाही. बायको चा हट्ट आणि त्यात दिवाळीची सुट्टी.

आम्ही दोघे सासरी आल्यावर रात्रीचे जेवण उरकून थोडं बाहेर ५ पावली करायला निघालो. बायको म्हणाली, मी लहानपणी तेव्हा एका ताई कडे जायची, खुप जीव लावायचे ते मला. मी म्हणालो, त्यांना कॉल करून सांग, आपण जाऊ घरी उद्या. पण त्या ताई कडे मोबाईल नव्हता, म्हणून उद्या संध्याकाळी घरी जायचं ठरवलं.



ताईंच्या घरी आल्यावर ते घरी नव्हते, घराला कुलूप पाहून आम्ही आजू बाजूला विचारपूस केली, तेव्हा समजले ताई एका लग्नाला गेले आहेत. मग आम्ही ताई येईल तो पर्यंत वाट पाहायचं ठरवलं.


म्हणून थोडं ताईच्या घराच्या अंगणात बसलो. जवळच नदी होती. म्हणून मी आजू-बाजूला निसर्ग पाहत होतो, गुलाबाच्या फुलांच्या झाडाने माझं मन मोहून घेतले. काही फोटो ही काढले.



या फोटोत गुलाबाचं फुल काही अस्पष्ट आले आहे पण समोर दिसणारी एक बाई स्पष्ट दिसत होती. नंतर मी आजू-बाजूचे फोटो ही काढले, साधारण त्यात माझे १०-१२ मिनिटं गेली असणार. ती बाई आहे अशीच एकाच जागी उभी होती. मला वाटले, संध्याकाळची वेळ आहे पूजा - पार्थना वैगेरे करत असेल. पण बराच वेळ निघून गेल्यावर मी बायकोला हाक मारली, म्हणालो इकडे ये. तिला वाटले आता सेल्फी काढायला बोलावणार, आधीच बायकोला फोटो काढण्याचा कंटाळा, म्हणाली काय हो, झाले का फोटोग्राफी करून ? मी म्हणालो इकडे ये तुला एक दाखवायचे आहे. ती आल्यावर तिला म्हणालो, मागे बघ.... ती बाई खूप वेळा पासून एकाच जागी उभी आहे.

बायकोने तिच्याकडे बघिल्यावर त्या बाई ने मान वर करून माझ्याकडे पाहिले, पाहून मनात धसका बसला, डोळे एकदम लाल, केस मोकळे आणि तोंडातून हूं हूं हुन आवाज करत एकाच जागेवरून मागे-पुढे हालत होती. ते पाहून बायकोने माझा हात घट्ट पकडला, आम्ही दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडला. बायको म्हणाली, चला येथून मला भीती वाटायला लागली.

मी म्हणालो, अगं घाबरू नकोस, ते काय भूत आहे का ? असं बोलताच त्या बाईने हात वर केले आणि उजव्या हाताच्या बोटाने मला इकडे ये असा बोटांचा इशारा केला. थोडं मी पण घाबरलो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला, माझ्या तोंडातून शब्दच गायब झाले, मी हळूच मागे पाहिले तर ताई होते. माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, काय दाजी खुप दिवसातून, रस्ता चुकले की काय? तसा मी घेतलेला दिर्घ श्वास सोडला, आणि कसाबसा कपाळावरचा घाम पुसत ताईंना म्हणालो, हो बरोबर रस्ता चुकला आज.

ताई म्हणाल्या कधी आले ? बायको म्हणाली अंग काय कुठे होती तू, एकतर तुझ्याकडे मोबाईल नाही, आजूबाजूला विचारपूस केली तेंव्हा समजलं तू लग्नाला गेलीस आणि लवकर येणार आहेस, म्हणून तुझी वाट पाहत येथेच थांबलो. मग आम्ही त्या बाईची नजर चुकवत कसाबसा घरात गेलो.

मग दोघींच्या गप्पांच्या नादात त्या बाईचे मनातून गेले. गप्पा मारता-मारता चहा-पाणी होता-होता रात्रीचे ९ वाजले होते. ताई म्हणाल्या, राहा ना आज जेवण करा आणि उद्या सकाळी जा. उशीर पण झाला आहे. मी म्हणालो नको आम्ही जातो, पाहिजे तर उद्या पुन्हा येतो. मी बाहेर दरवाजा कडे आलो, बूट घातले, तशीच नजर शेजारी गेली तर अंगावर काटाच आला. ती बाई अजून त्याच जागी उभी, माझ्याकडे नजर, केस पहिल्यापेक्षा जास्त विस्कटलेली दिसली. मी लगेच नजर खाली करून जमिनीवर पाहत गाडीच्या दिशेने निघालो. मला एक ठेसही लागली, पडता-पडता वाचलो. बायको आणि ताई माझ्या मागेच. ताई म्हणाल्या अहो, हळू दाजी हळूहळू चला. पण कसलं काय मला असे वाटत होतं की ती बाई माझ्याच मागे चालत आहे. खूप काळोख होता.


गाडी जवळ आल्यावर पाहिले तर चाकाची हवा गायब.  हे पाहून तर अजून भीती वाटायला लागली. ताई म्हणाल्या, अरे रे... इकडे कुठे जवळ गॅरेज नाही, चला घरी सकाळी बघू. पुन्हा घराच्या दिशेने जाताना माझे हात पाय थर-थरत होते. घरात आल्यावर मला खुप थंडी वाजून आली. बायको सुद्धा घाबरली होती, पण ताईंना काही बोलली नाही.

जेवणाची तयारी चालू झाली, मी गोधडी घेऊन मोबाईलवर व्हाट्सएपच्या स्टेटस वर गेलो, म्हटलं थोडं मन दुसरीकडे वळेल. मित्रांचे स्टेटस बघता-बघता तितक्यात त्या बाईचा स्टेटस मला दिसला.


हा स्टेटस फोटो पाहून माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. घाम फुटला, काय करू अन काय नाही अशी अवस्था झाली. बायकोने स्वयंपाक घरातून आवाज दिला अहो, या जेवायला.... जेवण तयार आहे. मोबाईल तसाच सोडून मी स्वयंपाक घरात गेलो. ताट वाढलेले, कसेबसे जेवण जेवलो.

ताई म्हणाल्या, काय झालं काय प्रॉब्लेम आहे का? जेवण आवडलं नाही वाटतं? मी म्हणालो, नाही ओ ताई तसं नाही, नवीन जागा आणि खुप थकवा आल्यासारखे वाटत आहे, म्हणून जेवण जास्त गेलं नाही. ताईंना काय माहीत माझी अवस्था कशामुळे अशी आहे ती.

न राहून मी ताईंना विचारले, काय हो ताई तुमच्या बाजूच्या घरात ती बाई एकाच जागी उभी असते ती कोण आणि ती अशी का उभी राहते ? काही प्रॉब्लेम आहे का तिला ? आजारी वाटतं आहे ती मला.

ताई म्हणाल्या कोण बाई ? अन तुम्ही कधी पाहिली तिला? कधी आले होते का मी नसताना ? मी एक टक ताईंच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होतो. मी म्हणालो, मी पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदाच त्या बाईला पाहिले आहे, माझं खोटं वाटत असेल तर चला बाहेर मी दाखवतो, ती बाई आम्ही आल्यापासून तिथेच उभी आहे.

ताई हसल्या आणि म्हणाल्या, अहो, काय दाजी खूप टिंगल करता तुम्ही. बायको आश्चर्यचकीत होऊन ताईला म्हणाली, अगं टिंगल कसली यात, मी सुध्दा संध्याकाळी त्या बाईला पाहिले आहे. आता ताई तर मोठ्याने हसायला लागले, आणि म्हणाले, घ्या आता वान नाही पण गुण लागला बाई हिला..... मग बायकोने ताईचा हात पकडला आणि बाहेर घेऊन गेली, बायकोने शेजारी नजर फिरवली पण ती बाई कुठे दिसली नाही. तिने मला हाक मारली, अहो या इकडं, ती बाई दिसत नाही, तसाच मी पण बाहेर आलो, शेजारी आजूबाजूला पाहिले, पण मलाही ती बाई दिसली नाही.

ताई अजून जोरात हसायला लागल्या अन म्हणाल्या, अरे बास बाबांनो अजून किती टिंगल करणार तुमच्या ताईची ? बायको आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिलो. घरात आल्यावर मला आठवले अरे हा.... मी तर मोबाईल मध्ये फोटो काढले होते, त्यात ती बाई नक्की आली असणार, म्हणून खाली पडलेला मोबाईल मी उचलायला गेलो तेवढ्यात हूं हूं हुन... आवाज ऐकायला आला. मी मोबाईल घेतला आणि फोटो गॅलरी उघडली. 

बघतो तर काय "त्यात त्या बाईचा फोटो आला नव्हता" 

"त्यात त्या बाईचा फोटो आला नव्हता"

"त्यात त्या बाईचा फोटो आला नव्हता"......





टिप्पण्या

Pooja म्हणाले…
मला वाचताना खूप भीती वाटली खूप डेंजर आहे
Pooja म्हणाले…
मला वाचताना च खूप भीती वाटली खूप डेंजर आहे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

एका जिवलग आत्म्याची गोष्ट