पोस्ट्स

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

माणसाच्या अंगातील कला - भाग १

इमेज
कला प्रतेक मानवाच्या अंगात एक ना एक कला असतेच... काहींच्या अंगात इतक्या कला असतात की, त्याच्या कलेला कुठे तोड नसते... अन् काहींच्या अंगात काहीच नसले की मनात मात्र भर - भरून कला असतात... मग मनात कला कशी असेल..? हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतलाच असणार...! स मोरचा कितीही गुण संपन्न असू, त्यात जो चुका काढतोच, ही त्याची एकमेव व आयुष्यभर पुरणारी मनात कला असते. या माणसांना कधीच कोणाचे चांगले देखवत नाही. अशी माणसे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात माहिर असतात, याला "नयनकला" असेही म्हणतात.  हे आनुवंशिक नसले तरी अशी माणसे लहानपणी समजायला लागल्यापासून तसेच असतात, कदाचित त्यांच्या सकस बुद्धीने त्यांना तशी देणगी दिली असणार. हे लोकं सुरवातीला आपल्या कुटुंबातही चुका काढत असतात, त्यात विजय झाले की बाहेरील लोकांच्या चुका शोधण्यात हुशार होतात... जसा - जसा अनुभव वाढतो तसा - तसा अजून वाव मिळतो... उदरणार्थ: एकदा अनोळखी माणूस रस्त्याने चालत असेल तरी, तो कसा चालतो, चप्पल कोणती घालतो, कपडे कसे आहेत, चालताना हात पुढे - मागे होतात की स्तब्ध हात घेऊन चालतो, इतके बारीक लक्ष ठेऊन असतात.  आता य...

राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती!

इमेज
राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती! 5 सप्टेंबरपूर्वी सुरू होणार भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टल  अ खेर शिक्षक भरतीची तारीख ठरली, 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडलं जाणार, पहिल्या टप्प्यात 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: 23 हजार शिक्षकांची भरती होईल. अनेक जिल्ह्यात ओपन आरक्षण शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे त्याची चौकशी करून कुठल्या आरक्षणांतून कुठला शिक्षक घेतला याची खात्री करून आरक्षणात टाकलं जाणार असल्याचं शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. राज्यातील शाळांमध्ये जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त राज्यात जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत 50 टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करता येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. खासगी अनुदानित...

Saral Portal Aadharcard Validate कसा करावा ?

इमेज
  Aadharcard Saral Portal मला वाटलं फक्त आधारकार्ड नंबर टाकायचा, पण कोणास ठाऊक आधारकार्ड validate करायचा... मला वाटलं फक्त जसच्या तसं लिहायचं पण कोणास ठाऊक आधारकार्ड spelling चुकवायचा.... मला वाटलं फक्त जसच्या तसं लिहायचं पण कोणास ठाऊक जन्म आपण बदलायचा... मला वाटलं फक्त आधारकार्ड विद्यार्थी भरायचा पण कोणास ठाऊक सोबती मुख्याध्यापक बसवायचा... मला वाटलं फक्त Parents कॉल करून फोटू मागवयाचा पण कोणास ठाऊक आधारकार्ड फोटो पाठवायचा वाट पहायचा... म ला वाटलं फक्त Saral Data भरायचा प ण कोणास ठाऊक इतका घाम निघायचा .... म ला वाटलं फक्त Aadhar नाव टाकायचा प ण कोणास ठाऊक बापाला - (dash) टाकायचा... मला वाटलं फक्त Aadhar नंबर भरायचा पण कोणास ठाऊक पुन्हा पुन्हा Validate करायचा.... पुन्हा पुन्हा Validate करायचा.... पुन्हा पुन्हा Validate करायचा.... Aadharcard Saral" - आधारकार्ड सरळ" न भरता आहे असाच भरावा...

Eye Flu Conjunctivitis प्रमाण वाढले, डोळ्यांचे आजार, पावसाळ्यातले आजार ( Over 2370 cases of viral conjunctivitis reported in Pune's temple town of Alandi )

इमेज
नमस्कार, मी विशाल डोळस, आपल्यासारखा सामान्य नागरिक. आळंदी नगरपरिषेद राहतो म्हणून हा खास लेख तुमच्यासाठी सदर करीत आहे. (Over 2370 cases of viral conjunctivitis reported in Pune's temple town of Alandi) पावसाळा म्हटलं की साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण एकदम वाढीस लागते आणि त्यातही पावसाळ्यात डोळ्यांचे आजार प्रचंड प्रमाणत वाढतात. मागच्या काही दिवसात डोळ्यांच्या या आजाराचे एकूण रुग्ण सुमारे २३७० च्या आसपास दिसून आलेले आहेत आणि जास्त करून यात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. तर या पार्शभूमीवर आज मी आपणास Marathi Corner वारसा मराठी भाषेचा या  मराठी लेखच्या माध्यमातून डोळ्यांच्या आजाराची कारणे, परिणाम, लक्षणे, उपाय, काळजी कशी घेणे आणि इतर माहितीच्या आधारे या सर्वांवर नजर टाकणार आहोत... दिल्ली मध्ये Eye Flu Conjunctivitis प्रमाण वाढले असून त्या सोबत आळंदी (देवाची आळंदी) तालुका खेड जिल्हा पुणे (महाराष्ट्र) ठिकाणी वाढत आहे. खेड तालुका आरोग्य अधिकारी, आळंदी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून आरोग्य पथका रवाना करत मुलांची आरोग्य तपासणी, आरोग्य सल्ला सेवा व उपचार, मार...

आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे

इमेज
  आज Social Media वरती आपण जेव्हा Page Scroll करतो, दोन Video नंतरचा प्रत्येक Video आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो, की बाबा केस कसे विंचरायचे, कपडे कसे घालायचे, Hotel मध्ये बसायचे कसं, जेवायचे कसं, उठायचं कसं..... आपल्या आई बाबा सोबत कसे बोलायचे, आपण ज्यांना जन्म दिलाय त्या मुलांबद्दल आपण कसे बोलायचं, कसं वागायचं.... तो त्यांचा  अनुभव झाला नाही का ... पण तो फक्त  त्यांचाच अनुभव झाला... आपला वेगळा असू शकतो एकाच प्रसंगतला दोन व्यक्तींचा अनुभव वेगळा असू शकतो की... जसं पाऊस पडायला लागला की एखाद्याला कविता करावीशी वाटते, एखाद्याला चिंता करावीशी वाटते, की बाबा छप्पर गळतय, करायचं काय त्याचं आपण... मला असं वाटते की   "दुसऱ्याच्या अनुभवाची शिदोरी ही आपल्या आयुष्याच्या प्रवासात कधी पर्यंत पुरणार ?... नाही का" हो, म्हणजे कधी पर्यंत पुरणार नाही का, आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे, पण आयुष्यात जगण्यासारखे खूप काही आहे, नाही का.....

RTE Admission 2023-24: "आरटीई" प्रवेशाची तिसरी फेरी या तारखेपासून

इमेज
  RTE Admission 2023-24: "आरटीई" प्रवेशाची तिसरी फेरी या तारखेपासून १३ हजाराहून अधिक जागा रिक्त "आरटीई" प्रवेशाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आत्तापर्यंत राज्यातील आरटीई २५% प्रवेशा अंतर्गत ७६ हजार २३३ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अजूनही राज्यात RTE च्या १३ हजाराहून अधिक जागा रिक्त आहे, आरटीईच्या दुसऱ्या फेरीतील म्हणजेच प्रतीक्षा यादीतील (Waiting List) मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, त्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांवर इतर मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ अंतर्गत आरटीई लॉटरी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली होती. कागदपत्र पडताळणी करून ६४ हजार २०६ मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तदनंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील २५ हजार ८९२ मुलांना अनुक्रमे मेसेज पाठवण्यात आले असून, त्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी सुरू...

आदिवासी विकास विभागाने दिली उभारी.. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

इमेज
आदिवासी विकास विभागाने दिली उभारी.. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शासकीय अनुदानित, विना अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा दिल्यावर योग्य मार्गदर्शनाअभावी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे त्यांचा या परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा कल वाढावा यासाठी इयत्ता ११वी व १२वी मध्ये शिकत असतानाचा या विद्यार्थ्यांकरीता अभियांत्रिकी, वैद्यकीय व विधी पदवी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटीस अभ्यासक्रम तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा तयारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आय. आय. टी. (IIT) मधील अभ्यासक्रमांना जास्तीस जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी (SSC) नंतर २ वर्ष कालावधीमध्ये नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन...

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 सूचना - बारावीचा निकाल जाहीर होणार आहे

इमेज
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 सूचना - बारावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र एसएससी निकाल 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र 10वीचा निकाल 2023 मे/जून पर्यंत ऑनलाइन प्रसिद्ध करते. mahresult.nic.in वर विद्यार्थी दहावीचा महाराष्ट्र एसएससी निकाल पाहू शकतात. MSBSHSE SSC निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना लॉगिन विंडोमध्ये त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाईप करावे लागेल. वेबसाइटवर लॉगिन क्रेडेन्शियल एंटर केल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 डिजिटल मार्कशीटच्या स्वरूपात डाउनलोड करू शकतात. दरवर्षी सुमारे 15 लाख विद्यार्थी महाएसएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी, MSBSHSE इयत्ता 10 वी मध्ये एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94% होती. गेल्या वर्षी 97.96% मुली उत्तीर्ण झाल्या तर 96.06% मुले महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र SSC निकाल 2023 तारीख आणि वेळ :- महाराष्ट्र बोर्डाने अधिकृत अधिसूचनेद्वारे MSBSHSE 10वीचा निकाल 2023 तारखेला प्रसिद्ध केला. येथे, विद्यार्थी MAHA SSC निकाल 2023 आणि इतर महत्त...

RTE २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत

इमेज
 तुम्ही आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन सोडत कधी निघणार या प्रतीक्षेत असाल, तर मग इकडे नक्की लक्ष द्या. शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत येत्या बुधवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार होती, सिलेक्शन यादीतील प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ नंतर एस एम एस (Sms - Text Message) पाठवले जातील. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार (आरटीई), दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले. राज्यातील सुमारे एक लाख एक हजार ९६९ जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख ६४ हजार ४७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर स...

मंदिरातली माय (एका आजीची खरी गोष्ट)

इमेज
  मंदिरातली माय (एक आजी) रोज येता-जाता त्या मंदिराच्या बाजूला माझे लक्ष जायचे, एक आजी दिसायची. एकदा घरी जाताना डब्ब्यातील राहिलेली चपाती भाजी तिला दिली. माझ्याकडे पाहून धन्यवाद बाळा म्हणाली. मी सुद्धा स्मित हास्य करून घरी निघालो. त्या टपरीच्या मागे एका चटईवर बसायची, रात्री तिथेच झोपायची. सकाळी सकाळी मंदिरात येणारे भक्त देव दर्शनासाठी येत, पण काय माहित? कोण मदत करत असेल कि नाही. तिथे बाहेर नारळ तर फोडायचे पण प्रसाद मात्र आजीला भेटायचा नाही. रात्रीचा राहिलेला भात व भाजी आणि सकाळी झालेल्या डब्ब्यातील थोडी भाजी चपाती आजीला जाताना देत असद. न राहून मी आजीला विचारले, आजी तुझे गाव कोणते? आजीने दोन मिनिट काहीच उत्तर दिले नाही. नंतर म्हणाली बाळा, तुझ्या सारखाच माझा एकुलता एक लेक आहे..... त्याचे वडील कोरोनामध्ये देवाघरी गेले, सुनेचे ऐकून त्याने मला येथे सोडले. मी त्याला दोन वेळेस जेवणाला जड झाले होते.... माझी घरी जायची आता इच्छा नाही, तरी ही तो मला घ्यायला येणारच नाही.... हे ऐकून माझे मन भरून आले, एकच शब्द बाहेर पडला "अरे देवा ! असे कोणासोबत करू नकोस रे" दुसऱ्यादिवशी जेव्हा मी त्या ठिक...

मराठी कविता - आठवणीतल्या बालपणात

इमेज
  आठवणीतल्या बालपणात आठवणीतल्या बालपणात सैर मारावी एकदा मनसोकत.... आठवणीतल्या बालपणात लहान व्हावे एकदा मनसोक्त.... आठवणीतल्या बालपणात ताणमुक्त व्हावे एकदा मनसोक्त.... आठवणीतल्या बालपणात मोठे होवूच नये आयुष्य तिथेच जगावे एकदा मनसोक्त.... आठवणीच्या बालपणात एकदा देवाने संधी दिलीच जगायची तर,  मारावी आठवणीच्या बालपणात सैर एकदा मनसोक्त.... एकदा मनसोक्त....  एकदा मनसोक्त....  एकदा मनसोक्त....

पहिला राष्ट्रीय महिला दिन - सरोजिनी नायडू

इमेज
पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा  क रण्यात आला? जाणून घ्या इतिहास भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात दरवर्षी १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. १२ व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. (  अजून कथा, गोष्टी वाचण्यासाठी  )सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देख...

RTE Information आरटीई फॉर्म माहिती २०२४-२५

इमेज
  आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया (शाळा नोंदणी नंतर पालकांना फॉर्म भरता येतात) आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया २३ जानेवारी पासून ते ३ फेब्रुवारीला पर्यंत. (तारीख पुढे मागे होऊ शकते) शिक्षण हक्क कायदाअंतर्गत (आरटीई) पुढील शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील खाजगी शाळांमधे आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या २५ % (टक्के) जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या नुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. हि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पालकांना अर्ज करता येणार आहे. तर पालकांनी अर्ज कसा करावा, कुठे करावा, त्या साठी कोण-कोणते कागतपत्र लागतात किंव्हा असायला हवेत ते आपण जाणून घेऊ. त्या आधी RTE नेमके काय त्या संदर्भात जाणून घेऊ. RTE चे आरक्षण नेमकं काय आहे? गरीब दुर्बल वंचीत घटकातील विद्यार्थी त्याचा कसा फायदा घेऊ शकतात ? RTE ( राईट टू एज्युकेशन ) विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत हे सर्व प्रवेश दिले जातात. पण त्यासाठी कोण पात्र असतं, कोणत्या अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवू...

Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी

इमेज
  Work Place Bad Habits - कामाच्या ठिकाणी वाईट सवयी कामाच्या ठिकाणी या वाईट सवयी घातक ठरू शकतात. यामुळे ना तुमचं इंक्रिमेंट होईल ना प्रमोशन..... तुम्हाला तुमच्या वर्कप्लेसवर प्रमोशन किंवा इंक्रिमेंट मिळवायची असेल तर तुमची वागणूक व तुमच्या वाईट सवयी बदलाव्या लागतील. त्या वाईट सवयी कोणत्या त्या जाणून घेऊया. वाईट सवयी (Bad Habits) : कुठल्याही कामाच्या ठिकाणी तुमच्या स्किल्ससोबत तुमची वागणूक महत्त्वाची ठरते. तेव्हा तुमची वागणूक कशी आहे त्यावर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट ठरू शकते. मात्र तुमच्या सर्व सवयी तुमच्या कामात आणि त्याचबरोबर तुमच्या करिअर सक्सेस मध्येही अडथळे आणू शकतात. अनेकदा असे होते की, तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीवदेखील नसते. कामाची सुरुवात न करणे : करिअर एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जे कर्मचारी स्वतःवरून कामाची सुरुवात करत नाहीत, त्यांची नवं काही शिकण्याची इच्छा / उत्सुकता नसते, ते सारखे घड्याळात बघत असतात. एखादं काम १ तासाचे असेल तरी त्या कामाला दोन तास लावायचे. हे बॉसला अजिबात आवडत नाही. तेव्हा तुमची ही सवय प्रमोशनच्या वेळी तुमची फजिती करू शकते. जे लोक स्वतःच्या आयडि...

पॉडकास्ट माहिती : म्हणजे काय, प्रकार, फायदे, पैसे कसे कमवावे?

इमेज
पॉडकास्ट माहिती : म्हणजे काय, प्रकार, फायदे, पैसे कसे कमवावे? (What Is Podcast Information In Marathi) पॉडकास्ट हा शब्द भारतात नुकताच लोकप्रिय होऊ लागला आहे. आजकाल कुठेतरी तुम्ही सर्वांनी पॉडकास्टचे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु आपल्या सर्वांनाच त्याबद्दल योग्यरित्या माहिती नसेल. याचा अर्थ असा नाही की या पॉडकास्ट प्रकारात वाव नाही. हा आपल्या सर्वांचा गैरसमज देखील असू शकतो. कारण परदेशातील लोक यूट्यूब आणि ऑनलाईन ब्लॉग वगळता पॉडकास्ट ऐकणे पसंत करतात. तुम्ही सर्वांनी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबमध्ये बरेच व्हिडिओ पाहिले असतील आणि कदाचित तुम्ही ते व्हिडिओ बनवले सुद्धा असतील. पण तुम्ही कधी ऑडिओ तयार किंवा रेकॉर्ड केला आहे का? आणि तुम्ही ते कुठेतरी अपलोड केले आहे का? जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वर आलात, तुम्हाला जर तुमच्या कल्पना शेअर करायच्या आहेत, तर तुम्ही यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरता आणि तुमच्या कल्पना लोकांशी शेअर करता, तर तसेच हा पॉडकास्ट हा देखील सोशल मीडियाचा एक भाग आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती शेअर करू शकता. लोगोसह शेअर करू शकता. ते कसे करायचे? पॉडकास्ट चा अर्थ काय आहे, ...

कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ?

इमेज
कधी सुरू होतोय चंद्रग्रहण सुतककाळ? ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये... "आधी थोड्याच समजून घेऊ नेमके काय असते ग्रहण" खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ? सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असे संबोधले जाते. चंद्राचा फक्त काही पृष्ठभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. ही सावली किती मोठी आहे, तितका तिचा प्रभाव दिसून येतो. या वेळी चंद्राच्या इतर भागावर गडद लालसर किंव्हा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात. देशातील पूर्वोत्तर राज्यात पूर्ण चंद्रग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास चंद्रग्रहण ( Chandra Grahan 2022)   बघायला मिळणार आहे. देशात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा सूतककाळ ८ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांला सुरू होणार आहे. चंद्रग्रहणाचा काळ हा ९ तासांचा असणार आहे. भारतातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये कंकणाकृती चंद्रग्रहण दिसणार आहे. भारताशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पेसिफिकमध्ये देखील चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेता येईल. भारतात प्रमुख शहर...

सूर्यग्रहण - भारत

इमेज
 दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज २५ ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. २०२२ सालातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2022 ) आहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कारण, असे ग्रहण पुढील दशकभर भारतातून दिसणार नाही. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे. ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त ४३ टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात २ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणार आहे.भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:२९ वाजता सुरू होणार आहे. हे...

प्रेरणादायी लीडर कसे बनाल

इमेज
जेनिफर नावाचा एक तरुण संस्थेत कामाला लागला. खरं तर सुरवातीलाच काही लोकांना जेनिफर हे नाव थोड विचित्र वाटलं, वेगळं नाव वाटलं. पण याच वेगळ्या नावाच्या तरुणाने चमत्कार घडवला. तो म्हणजे असा की, जेनिफर सुरवातीला ज्या डिपार्टमेंटमध्ये कामाला गेला तिथे काही दिवसातच सर्वांना अस दिसलं की, या डिपार्टमेंटची क्षमता वाढली आहे. तिथली पेंडिंग कामं भराभरा संपत चालली होती. फक्त त्याच डिपार्टमेंटची नाही तर इतर असणाऱ्या विभागाचंही तसच व्हायला लागलं. त्या नंतर दर तीन महिन्यानंतर जेनिफरची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. ज्या ज्या विभागात जेनिफरची बदली करण्यात आली त्या त्या विभागात आश्चर्य दिसायला लागलं. तो विभाग क्षमते पेक्षा जास्त चागलं काम करायला लागला. त्या कंपनीच्या मुख्य प्रबंधकाला याच आश्चर्य वाटलं की, असं कसं घडलं....? ज्या वेळेस त्यानी विचारणा केली असता, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की, जेनिफर ज्या ठिकाणी जातो तिथे त्याच्या सहकाऱ्यांना प्रचंड मोठे प्रेरणास्रोत बनतो. ज्या मॉल मध्ये त्याला काम मिळालं होते त्या मॉल मधून त्याला शहरातल्या त्याच कंपनीच्या दुसऱ्या मॉल मध्ये पाठवले गेले. तिथेही त्याच घटना...

मैत्री

इमेज
लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण त्यात एखादाच मित्र असतो. मित्र म्हणजे काय तर....  तहान लागल्यावर पाण्याची किंमत कळते, तशी गरज लागल्यावर मित्राची किंमत कळते... कामापूरता मामा (पुरे-पुर वापर करणारा मित्र) नेट प्रॉब्लेम आहे रे...उद्या देतो, काय पळून चाललोय काय? ए टी म ब्लॉक झालंय... पगार झाला नाही, काय सांगू आत्ताच गाडीचा हफ्ता दिलाय, पुढच्या महिन्यात पगार झाल्या-झाल्या तुलाच देणार... फक्त आठवण कर मित्रा... बस का भावा-विसरला का? काय हिरो-एकटा एकटा कुठे फिरतो, आम्हालाही बोलवायचं-आलो असतो की... वहिनी माहेरी गेली वाटतं, लई खुप दिसतोय असे जखमेवर मीठ चोळणार मित्र. अरे ती नाही म्हणाली म्हणून काय झालं? जगात ढिगानी पडलेत, ती काय इंद्राची परी आहे का, दुसरी शोधू असे समजून काढणार मित्र. स्टेटस भारी-भारी टाकतो, आपल्याच शाळेत होतास ना मित्रा. किंव्हा शेवटी मित्र कोणाचा... असे क्रेडिट स्वतः ओढून घेणार... कोण रे ती लाल ओढणीवली स्टेटस मध्ये? असे अनेक-अनेक न सुचणारे प्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25